बास करा एका निष्पाप मुलीच्या दु:खद कहाणीचा राजकारणासाठी, टीआरपीसाठी वापर करणे. आधी निर्भया आता असिफा आणि न जाणो अशा अजून किती असतील?
बलात्काऱ्याला आणि पीडिताला जात, धर्म नसतो. एकाची असते ती गलिच्छ वासना आणि दुसरी असते ती त्या वासनेला बळी पडलेली निष्पाप कळी.
सत्ताधारी आणि विरोधी दोघेही या प्रसंगाचा आपआपल्या पक्षासाठी वापर करुन घेणार. मीडिया सतत तेच तेच दाखवून आपला टिआरपी वाढवायचा प्रयत्न करणार. उद्या न्याय मिळेलही आसिफाला, जसा निर्भयाला मिळाला; पण तिच्या आई वडिलांच काय ? त्यांना त्यांची मुलगी कधीच परत मिळणार नाही.
असिफाच्या जागी पूजा, जसविंदर, ज्यूली कोणीही असू शकत. कधी त्यांच्या कपड्यांवर टिका/ चर्चा तर कधी त्यांच्या धर्मावर .. पण कधीतरी विचार करा त्या जीवाचे किती हाल होत असतील. मन, शरीर, आत्मा सगळ्याचीच अवहेलना, कूचेष्टा सहन करताना काय परीस्थीती ओढावत असेल त्या निष्पाप जीवावर?
"मन चिंती ते वैरी न चिंती" असं म्हणतात ते खरच आहे. कधीकधी मनात विचार येतो, "या जागी आपली मुलगी असती तर?" काळजात धस्स होतं मग.... ज्या गोष्टीची कल्पनाही सहन करु शकत नाही ती गोष्ट कोणाच्यातरी लेकीच्या बाबतीत घडलेय .... नाही नाही .....कल्पनाच करु शकत नाही मी त्या आई-वडिलांच्या दु:खाची. ज्या मुलीला नऊ महिने आपल्या पोटात वाढवल आणि त्यानंतर आठ वर्ष फुलासारख जपल, तिच्यासाठी अगणित स्वप्न पाहिली ... त्या लेकीची अशी अवस्था?.... कस सहन करत असेल ती माऊली? असं म्हणतात, 'एक पुरुष आयुष्यात सगळ्यात जास्त प्रेम कोणावर करत असेल तर ते आपल्या मुलीवर.' काय अवस्था झाली असेल त्या बापाची आपल्या मुलीच शव बघितल्यावर?
अशा दु:खद घटनांचा उपयोग आपल्या स्वार्थासाठी करण्याची प्रवृत्ती खरच चीड आणणारी आहे. मी कुठल्याही पक्षाची समर्थक नाही. मला राजकारणाशी काहीही देणं घेणं नाही. मी एका मुलीची आई आहे आणि अशा प्रसंगानंतर एका आईच्या मनात ज्या गोष्टी येत असतील त्याच गोष्टी माझ्या मनात आल्या. जे घडल ते खूपच दूर्दैवी होत पण त्याहीपेक्षा या घटनेच स्वार्थासाठी जे भांडवल केल जातय ते यापेक्षाही दु:खद आहे.
आपण चार दिवस चर्चा करु, काही जण नराधमांना शिक्षा झाली पाहिजे म्हणून मोर्चे निघतील तिथेही पुन्हा दगडफेक, जाळपोळ यासारखे प्रकार घडतील, पण पुढे काय? मुळात ही नीच प्रवृत्ती नष्ट व्हायला पाहिजे यासाठी काय करता येइल याचा निदान विचार तरी करतो का आपण? खरच हा विचार करायला हवा अस नाही वाटत तुम्हाला ?
©मानसी जोशी
बलात्काऱ्याला आणि पीडिताला जात, धर्म नसतो. एकाची असते ती गलिच्छ वासना आणि दुसरी असते ती त्या वासनेला बळी पडलेली निष्पाप कळी.
सत्ताधारी आणि विरोधी दोघेही या प्रसंगाचा आपआपल्या पक्षासाठी वापर करुन घेणार. मीडिया सतत तेच तेच दाखवून आपला टिआरपी वाढवायचा प्रयत्न करणार. उद्या न्याय मिळेलही आसिफाला, जसा निर्भयाला मिळाला; पण तिच्या आई वडिलांच काय ? त्यांना त्यांची मुलगी कधीच परत मिळणार नाही.
असिफाच्या जागी पूजा, जसविंदर, ज्यूली कोणीही असू शकत. कधी त्यांच्या कपड्यांवर टिका/ चर्चा तर कधी त्यांच्या धर्मावर .. पण कधीतरी विचार करा त्या जीवाचे किती हाल होत असतील. मन, शरीर, आत्मा सगळ्याचीच अवहेलना, कूचेष्टा सहन करताना काय परीस्थीती ओढावत असेल त्या निष्पाप जीवावर?
"मन चिंती ते वैरी न चिंती" असं म्हणतात ते खरच आहे. कधीकधी मनात विचार येतो, "या जागी आपली मुलगी असती तर?" काळजात धस्स होतं मग.... ज्या गोष्टीची कल्पनाही सहन करु शकत नाही ती गोष्ट कोणाच्यातरी लेकीच्या बाबतीत घडलेय .... नाही नाही .....कल्पनाच करु शकत नाही मी त्या आई-वडिलांच्या दु:खाची. ज्या मुलीला नऊ महिने आपल्या पोटात वाढवल आणि त्यानंतर आठ वर्ष फुलासारख जपल, तिच्यासाठी अगणित स्वप्न पाहिली ... त्या लेकीची अशी अवस्था?.... कस सहन करत असेल ती माऊली? असं म्हणतात, 'एक पुरुष आयुष्यात सगळ्यात जास्त प्रेम कोणावर करत असेल तर ते आपल्या मुलीवर.' काय अवस्था झाली असेल त्या बापाची आपल्या मुलीच शव बघितल्यावर?
अशा दु:खद घटनांचा उपयोग आपल्या स्वार्थासाठी करण्याची प्रवृत्ती खरच चीड आणणारी आहे. मी कुठल्याही पक्षाची समर्थक नाही. मला राजकारणाशी काहीही देणं घेणं नाही. मी एका मुलीची आई आहे आणि अशा प्रसंगानंतर एका आईच्या मनात ज्या गोष्टी येत असतील त्याच गोष्टी माझ्या मनात आल्या. जे घडल ते खूपच दूर्दैवी होत पण त्याहीपेक्षा या घटनेच स्वार्थासाठी जे भांडवल केल जातय ते यापेक्षाही दु:खद आहे.
आपण चार दिवस चर्चा करु, काही जण नराधमांना शिक्षा झाली पाहिजे म्हणून मोर्चे निघतील तिथेही पुन्हा दगडफेक, जाळपोळ यासारखे प्रकार घडतील, पण पुढे काय? मुळात ही नीच प्रवृत्ती नष्ट व्हायला पाहिजे यासाठी काय करता येइल याचा निदान विचार तरी करतो का आपण? खरच हा विचार करायला हवा अस नाही वाटत तुम्हाला ?
©मानसी जोशी