आठवणी ! किती अद्भूत शब्द आहे ना हा!
नुसता ऐकला किंवा वाचला तरी मनातल्या मनात कोणाचीना कोणाची आठवण येते.
या आठवणी कधी मन हळवं करतात तर कधी रडता रडता हसायला लावतात.
कधी प्राजक्ताच्या फुलांप्रमाणे डोळ्यातून टपटप ओघळतात
तर कधी रातराणीच्या गंधापरी मनात हळूवार दरवळतात.
एखाद्या दिवशी पहाटेची भूपाळी किंवा मंदिरातला घंटानाद ऐकून मन बालपणात जातं.
तर कधी एखाद्या सकाळी चहाचा दरवळणारा गंधही मनात माहेरची आठवण घेऊन येतो.
आई बाबांबरोबर गप्पा मारत प्यायलेला चहा, भावंडाबरोबरची भांडणं, सगळं अगदी काल परवा घडल्यासारखं वाटतं.
एखाद्या हळव्या रात्री झोपताना गोधडी अंगावर पांघरली की आजीच्या आठवणीने मन भरुन येतं.
एखादं छोटं बाळ बघितलं की आपल्याच पिल्लाचं बालपण आठवतं.
लेकीचा अभ्यास घेताना शाळेतल्या आठवणी जाग्या होतात.
मग मनात येतं इतकी वर्ष झाली तरी काहीच बदलेलं नाही.
संध्याकाळच्या आठवणींबद्दल काय लिहू? ही संध्याकाळ तर अक्षरशः वेड लावते.
एखाद्या संध्याकाळी मित्र मैत्रीणींबरोबर घालवलेला वेळ आठवतो.
ती चेष्टा मस्करी, गॉसिप सगळं आठवून मनात हसू उमटतं.
मग नकळत फोन हातात घेऊन त्यावेळच्या ग्रूपमधल्या कोणालातरी फोन करावासा वाटतो पण, 'बिझी असेल तर ?' हा विचार मनात येतो आणि मग विचार बदलतो.
तर कधी एखाद्या निवांत संध्याकाळी हमखास 'तिची किंवा 'त्याची' आठवण येते आणि मन हेलावून जातं.
मनाला एक वेगळीच हुरहूर लागते. या आठवणींमधून बाहेर पडायला मनही सहजासहजी तयार होत नाही.
वेळ मात्र कापरासारखी निघून जात असते आणि नाखूषीने का होईना मनाला आठवणींच्या राज्यातून बाहेर यावच लागतं.
आठवणीत जागणाऱ्या रात्री मात्र बरेचदा डोळे शुष्क करतात.
मुक्याने अश्रू ओघळत रहातात आणि रात्रभर जागून पुन्हा पहाटही भिजवून टाकतात.
©मानसी जोशी
नुसता ऐकला किंवा वाचला तरी मनातल्या मनात कोणाचीना कोणाची आठवण येते.
या आठवणी कधी मन हळवं करतात तर कधी रडता रडता हसायला लावतात.
कधी प्राजक्ताच्या फुलांप्रमाणे डोळ्यातून टपटप ओघळतात
तर कधी रातराणीच्या गंधापरी मनात हळूवार दरवळतात.
एखाद्या दिवशी पहाटेची भूपाळी किंवा मंदिरातला घंटानाद ऐकून मन बालपणात जातं.
तर कधी एखाद्या सकाळी चहाचा दरवळणारा गंधही मनात माहेरची आठवण घेऊन येतो.
आई बाबांबरोबर गप्पा मारत प्यायलेला चहा, भावंडाबरोबरची भांडणं, सगळं अगदी काल परवा घडल्यासारखं वाटतं.
एखाद्या हळव्या रात्री झोपताना गोधडी अंगावर पांघरली की आजीच्या आठवणीने मन भरुन येतं.
एखादं छोटं बाळ बघितलं की आपल्याच पिल्लाचं बालपण आठवतं.
लेकीचा अभ्यास घेताना शाळेतल्या आठवणी जाग्या होतात.
मग मनात येतं इतकी वर्ष झाली तरी काहीच बदलेलं नाही.
संध्याकाळच्या आठवणींबद्दल काय लिहू? ही संध्याकाळ तर अक्षरशः वेड लावते.
एखाद्या संध्याकाळी मित्र मैत्रीणींबरोबर घालवलेला वेळ आठवतो.
ती चेष्टा मस्करी, गॉसिप सगळं आठवून मनात हसू उमटतं.
मग नकळत फोन हातात घेऊन त्यावेळच्या ग्रूपमधल्या कोणालातरी फोन करावासा वाटतो पण, 'बिझी असेल तर ?' हा विचार मनात येतो आणि मग विचार बदलतो.
तर कधी एखाद्या निवांत संध्याकाळी हमखास 'तिची किंवा 'त्याची' आठवण येते आणि मन हेलावून जातं.
मनाला एक वेगळीच हुरहूर लागते. या आठवणींमधून बाहेर पडायला मनही सहजासहजी तयार होत नाही.
वेळ मात्र कापरासारखी निघून जात असते आणि नाखूषीने का होईना मनाला आठवणींच्या राज्यातून बाहेर यावच लागतं.
आठवणीत जागणाऱ्या रात्री मात्र बरेचदा डोळे शुष्क करतात.
मुक्याने अश्रू ओघळत रहातात आणि रात्रभर जागून पुन्हा पहाटही भिजवून टाकतात.
©मानसी जोशी
No comments:
Post a Comment